Thursday, April 24, 2014

गुरुक्षेत्रम मंत्र हा मला माझ्या सद्‌गुरुंनी दिलेला मंत्र आहे. जेव्हढा वेळ तुम्ही गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणता त्यावेळी तेव्हढा वेळ ते गुरुक्षेत्रम्‌ तुमच्या मनामध्ये तयार होत असते आणि गुरुक्षेत्रम्‌ आले म्हणजे त्यातील चारही गोष्टी व त्रिविक्रमही आलाच ह्यांच्यासोबत त्या धर्मासनावर बसलेला आमचा मित्रही तेव्हढया वेळेसाठी आमच्या मनामध्ये येतो. पण जर मी १० वेळा म्हटले तरी काही फायदा झाला नाही असा विचार करुन मी हा मंत्र म्हटला तर काहीही उपयोग होणार नाही. 

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना काम, क्रोध ह्यांची मनातील गर्दी हलवायचा प्रयत्न करा.
समजा १०८ वेळा जर पूर्ण म्हणता येत नसेल तर फक्त अंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल. 
माझे मन मला गुरुक्षेत्रम्‌ मंत्रासाठी दिवाण-ए-खास बनवायला हवे 


१.११.२०१२

साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहात अनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेच जीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरची नाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पण दूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीच राहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतात पण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.
 
जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचं जीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबाने मातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌, रामरसायन आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही
जे सद्‍गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिक आहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.

आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वार असणार सद्‍गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका.
माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मात मला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढे अडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युग आल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमची first priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आज उपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्व सांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथे आलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतो quanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असते सतत बदल घडत असतो

ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तो कधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही. ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तो त्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहे त्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुप आहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्ही क्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्‍या कोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे, मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.

"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा. तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतो पण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातील सतत बदलणार्‍या quanta ला आधार फक्त त्याचाच असू शकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणाल नंतर जन्म घेणार्‍या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची" जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्या प्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन.त्यांना मृत्यु कधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्माला घालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो. त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो. द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तर कलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवला आहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.

गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे, ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.
 
ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावान आहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारी होतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वर तुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.
 
खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढे चला पण आजपासून निश्चय करा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"
 
आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहे व आज रात्री प्रत्येकाने म्हणा -
 
"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"  व प्रेमाने आपल्या गुरुला  म्हणा - "I LOVE YOU"