Tuesday, October 24, 2023

अहिल्या माता शीळा होण्यामागची कथा. -2

*प्रसंग चौथा*
वर्ष ३७ वे. याज्ञवल्क्य ऋषी निघालेत लेकीला भेटायला. रस्त्यात त्यांना त्रिविक्रम आणि माता जगदंबा एका मायलेकरांच्या नाट्य प्रसंगातून साक्षात्कार, संकेत देतात. 
त्यांना कळते आता अहल्येचा पुत्र शतानंदाना अहल्येच्या भेटीला घेऊन जाण्याची वेळ आली. 
ते शतानंदानकडे जातात. 
त्यांना सांगतात,,, स्वयंभगवानाने मला तुला मातेच्या भेटीला नेण्याचा संकेत दिला.
झाले....... 
दोघेही तिकडे जातात. अहल्या रूपी शीळेतुन अव्याहत महामंत्र गजर ऐकू येत होतात. 
आजुबाजुचा परीसरही मंत्रवत झाला होता. आणि आता अचानक चतुर्भुज स्वयंभगवानाचे दर्शन त्यांना झाले. 

पहिले आनंद झाला. कारण खूप खूप प्रेम होते शतानंदाचे स्वयंभगवानावर. 
पण दुसऱ्याच क्षणाला शतानंद त्रिविक्रमावर रागावून बोलु लागले. 
ते म्हणाले, मला खुप राग येतोय देवा तुझा. 
तु का ताटातुट केली मायलेकरांची.... 
माझे वडील गौतम ऋषी चुकले पण तु हे सगळे होण्यापासून थांबवू शकत होता. 

असे रागावून, चीडून बोलून झाल्यानंतर सगळे शांत होते. 
आणि एकदाचे सगळे मनातले बोलून झाल्यावर शतानंद ही शांत झाले. 
शेवटी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर, जवळच्या वरच आपण चीडतो हक्क दाखवतो तसेच झाले. 

पण लगेच आता देवावर रागावलो ह्याचे त्यांना खुप दुख: झाले. 
ते म्हणतात मी चुकलो देवा.... 
आता माझ्या ह्या चुकीची तु शिक्षा दे..... मला माफ नकोस करू........ 

*प्रसंग  पाचवा*
स्वयंभगवान म्हणतात,  
तु मला जे बोललास तो राग नव्हता..... तो तुझा शोक, दुख:
होते.... .. जे तु आईच्या प्रेमापोटी व्यक्त केले. 
पण तुला शिक्षा होणारच. 
आणि त्रिविक्रम शतानंदाना आई सारखाच शीळा होशील म्हणून शिक्षा दिली. 
माफी मागण्यासाठी त्यांनी स्वयंभगवानांच्या पायावर लोटांगण घातले होते. त्याच अवस्थेत ते शीळा झाले. 
मात्र त्यांना  ऐकु येत होते. 
दिसत होते. समजत होते. 
त्यांना लक्षात येतंय की अरे.... 
आपले डोके तर आपल्या आईच्या अहल्येच्या मांडीवर आहे. 
आई डोक्यावरून प्रेमाने हात फीरवतीये.... 
तीच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांना जाणवू लागला. 
आणि *तिच्यातला (अहिल्यामातेतला) मंत्रगजर त्यांच्या बुध्दिमत्ता, मनात, देहात पसरू लागला.* समुद्राच्या लाटा जश्या, ज्या वेगाने येतात त्या प्रमाणे त्या मंत्रगजर लहरी त्यांच्यात प्रवाहित होत होत्या. 

जसे एखाद्या पेशंटला सलायन, औषधे दिल्यावर,,,, 
जसजसे ते औषध शरीरात भीणते तसतसे त्या पेशंट मध्ये लगेच सुधारणा दिसते. 

किंवा तहानलेल्या व्यक्तीला पाणी, 
भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळाल्यावर शरीराला तरतरी येते त्याप्रमाणेच ह्या मंत्रगजरामुळे श्रध्दावानाच्या मनाला, बुध्दी ला, देहाला ऊर्जा मिळते. 

ह्यावरून आपल्याला हे लक्षात येते की आपणही जेवढा जसा जमेल तसा,,,,तेवढा मंत्रगजर करत राहिलो तर *आपणही आपल्या मुलांना आशिर्वाद स्वरूप मंत्रगजराचे कवच त्यांच्या पर्यंत पोहोचवु शकतो ना... शेवटी हा वात्सल्य भाव आहे.*
आपल्यात अहल्येइतकी तप साधना नसली तरी आपण भक्ती वाढवली तर हे होऊ शकेल असे मला वाटते,, हो ना बापु..... 

आणि एकीकडे हा मंत्रगजर आणि दुसरीकडे तीने गायलेली अंगाई ऐकु येऊ लागली. 

आता अहल्या माता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देते. 

बाळा, मी शीळा झाले त्यात माझीच चुक होती. 
मी महामती होते. 
मी अतिशय ज्ञानी होते. 
(लावण्य, सौंदर्यवती तर होतीच माता) 
आणि ह्या सगळ्या प्रवासात माझी भक्ती कमी पडली. 
माझ्या ज्ञानाचा मला अहंकार झाला. 
आणि *जेव्हा भक्ती कमी पडुन अहंकार वाढतो तेव्हा बुध्दी ही पाशाणच झालेली असते.*

आणि कदाचित म्हणूनच माझ्याकडून भक्ती करून घेण्यासाठीच मला हा तपस्येसाठी चा वेळ स्वयंभगवानाने मला दिला,,,, आणि मी शीळा झाले. 

इथे जरी लौकिक दृष्टी जरी आपल्याला ही शिक्षा वाटली तरी, 
अहल्येमातेसाठी तीच्या भक्तीवृध्दिसाठी हे एकप्रकारे वरदानच होते. 
आणि नंतर परत अहल्या माता अचेतन होते आणि शतानंद सचेतन. 
पण आता स्वयंभगवान अंतर्धान पावतात. 
*याज्ञवल्क्य ऋषी, शतानंदाना म्हणतात, बघ किती वात्सल्य आहे स्वयंभगवानामधे....त्यांनी तुझी आणि तुझ्या मातेची भेट घडवून आणली.*
तुझे कुतर्क दुर केले. आणि ह्या अनुशंगाने अहल्या मातेला ही पुत्र भेटीचा आनंद दिला. 

हे सगळे इतके सुंदर आहे की आपल्याही मनाचे रूपांतर बापुंनी  चीत्तात करायला सुरुवात केली. मन तृप्त होते. 
*बापु आम्ही खरंच बापुज्ञ,अंबज्ञ आहोत.*

🙏🏻जय जगदंब जय दुर्गे🙌🏻

WhatsApp message
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

हरि ॐश्रीरामअंबज्ञ
नाथसंविध्

( वर उल्लेखित केलेला प्रसंग दैनिक प्रत्यक्ष मधील तुलसी पत्राच्या संदर्भात आहे. दैनिक प्रत्यक्ष : तुमच्या उपासना केंद्रावर विकत घेण्यासाठी संपर्क करा)

No comments:

Post a Comment