Thursday, November 9, 2023

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१४.११.२०१३- कामधेनू गोमाता गोपद्म विशेष )
॥ हरि ॐ ॥

ॐ मंत्राय नम: ॐ रामवरदायिनी बघताना आपल अनेक algorithem बघत चाललो आहेत. हे algorithem म्हणजे विश्वाची रचना आहे. म्हणजेच स्वत:चीच रचना आहे. म्हणून हे algorithem आमच्या नित्याच्या जीवनात व्यवस्थित बसतात, काम करत असतात. हे फक्त ऐकून सोडून चालणार नाही.

असाच एक आदिमातेचा algorithem आहे. कुठलेही शुभकार्य असताना स्वस्तिक सोबत दारात गोपद्म काढतात. चार गोपद्म काढली जातात.

आम्हाला माहीतच आहे गाय पवित्र आहे म्हणून तिची चार पावले काढली जातात. सध्या ३ दिवस तुलसी विवाहाचे दिवस आहेत. पूर्वी तुळशी वृंदावन असायचे तिथे सकाळ संध्याकाळ गोपद्म काढली जायची.
ज्यांच्या घरी गौरी येते त्यांना माहीत असेल दारात गोपद्म काढल्याशिवाय गौरीला आत आणत नाहीत का? म्हणजे  कुठेतरी देवीतत्वांशी ह्याचा संबंध आहे.
तुळशी वृंदावनासोबत अजून एका ठिकाणी गोपद्म काढली जातात? कुठे? गोपद्म काढणे अत्यावश्यक मानले जाते? प्रत्येक स्त्री ती गोष्ट दरवर्षी करतेच ती म्हणजे भाऊबीज.
भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा पाटावर बसून ओवाळले जायचे तेव्हा गोपद्म काढले जायची भाऊबिजेशी गोपद्मचे नाते काय?
हा गोपद्म जेव्हा algorithem म्हणून समजून घ्यायचा तेव्हा आपल्याला काय जाणून घ्यायचे. आदिमातेची तीन स्वरूपं स्थूल (अनसूयामाता), सूक्ष्म ( माता) व तरल (गायत्रीमाता) पातळीवरची पण ह्या आधीची दत्तगुरूंची ’नि:स्पंद’ जाणीव म्हणजे अदिती.
गोपद्म म्हणजे गोमातेची चार पावले आहेत.
दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते. या दिवशी पूर्वी गाय व तिचा वत्स म्हणजेच वासराचे पूजन केले जायचे.
सप्तपदीच्या वेळी तुम्ही ७ पावले घेता त्या ७ पावलांबरोबर, ७ शपथा, ७ promises, ७ वचने असतात.
इथे गोमातेची ४ पावले आहेत. ह्या पावलांसोबत गोमाता काय घेते हे बघायला हवे. ही गाय आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे. म्हणजे नक्की काय? प्रत्येक गाय ही भारतीयांनी कामधेनू मानलेली आहे. कामधेनू नावाची गाय जी ऋषी वसिष्ठांकडे होती ती आधी जमदग्निकडे होती. ही कामधेनू म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाने ज्यांनी तिला माता मानले त्यांना तिने पाहिजे ते पुरवले.पण ज्यांनी मदांध बनून तिला भोग्य मानले त्या प्रत्येकाचा तिने नाश घडवून आणला. ह्या कामधेनूचा अंश प्रत्येक गोमातेत असेल असा वर गोमातेला मिळाला म्हणून आम्ही गाईला पवित्र मानतो. आजही गोमातेला जे नमस्कार करतात ते मला आवडते. कुठलेही पाप चालेल पण गोमांस खाण्याचे पाप कधीही करू नका. एकवेळ ऊपाशी रहा पण गोमांसला स्पर्शदेखील करू नका. 
 गोमाता जेव्हा जगेल तेव्हाच हिंदुस्तान जगेल. गोमांसला कधीही, चुकुनही स्पर्शही करु नका. जेव्हा नॉनव्हेज खायला बाहेर जाल तेव्हा हे कन्फर्म करा. चीझ खातानाही ते चीझ व्हेज आहे ह्याची खात्री कारा. गाय ही आपल्याला अतिशय पुजनीय आहे आणि गोमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. 
तुम्ही जेव्हा non-veg जेवायला बाहेर जाता तेव्हा एखादे पदार्थाचे नाव कळले नाही तर विनासंकोच विचारा, कुणाचे मांस आहे ते. चुकून खाल्ले तर मी त्यातून बाहेर काढू शकेन, पण मुद्दामहून कधीच गोमांस खाऊ नका. cheese खाताना पण विचारा ते veg आहे की non-veg आहे. काही ठिकाणी cheese गोमातेच्या enzymes पासून बनवले जातात. अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पाप लागणारच. म्हणून शाकाहारी cheese खाण्यासाठी आग्रह करा. ह्या आधी चुकून खाल्ले गेले असेल तर ते पाप मी धुऊन टाकले. त्याची काळजी करू नका. यापुढे मात्र दक्ष रहा.
गोमांस व गोहत्येचे पाप आपल्याला लागता कामा नये. पॅकेजवर हिरवा dot असतो. तो बघून veg cheese वापरा.
समजा चुकून खाल्ले गेले तर शांतपणे सांगा अनिरुध्दा मी विसरलो. अशावेळी माझ्यासाठी सोपे आहे.
म्हणून गुरुपौर्णिमेला मी सांगतो तुमची पापं मला द्या.
आदिमातेचे नियम तिच्या बाळांसाठी आहेत. तुम्ही तिचे कैदी नाहीत. त्या नियमांचे पालन करुन घेण्याचे काम तिने तिच्या पुत्रांकडे दिलं आहे. प्रत्येक घरी शिस्त बाणणं अत्यंत आवश्यक असते.
कामधेनू ही संकल्पना वैदिक आहे. कामधेनू म्हणजे काय? तर आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या शक्ती नाडीद्वारे प्राप्त होते. त्या शक्ती नाडीसच ऋषीमुनी कामधेनू म्हणतात.
शक्ती नाडी म्हणजे आईच्या गर्भात बाळ नाळेशी जोडलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण त्या आदिमातेशी नाळेद्वारे direct जोडलेले असतात त्यालाच शक्ती नाडी असे म्हणतात तीच कामधेनू.

ही असते कुठे? जे जे म्हणून पृथ्वीच्या, वसुंधरेवर जे जे म्हणून अवकाशातून खाली येते. त्या प्रत्येक गोष्टीत ह्या शक्ती नाडीचे अस्तित्व असते.
पृथ्वीच्या ionic sphere च्या खालून जे येते ते शक्ती नाडी, पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण हे शक्ती नाडी स्वरुप आहे.

चंद्रप्रकाश हे शक्तीनाडी स्वरूप आहे. वीज हीसुध्दा शक्तीनाडी स्वरूप आहे.

sunlight (सूर्याचा प्रत्येक किरण)

moonlight (चंद्राचा प्रत्येक किरण)

rain (पावसाचा प्रत्येक थेंब)

electricity (आकाशात कडाडणारी वीज)

ह्या चार गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर येत असताना, २४ तासापर्यंत शक्तीनाडीचे काम करत असतात. २४ तासापर्यंत अहोरात्र १ दिवस - १ रात्र त्यांच्यात शक्तीनाडीचे कार्य करण्याची क्षमता असते.

ह्या २४ तासात जे पावसाचे पाणी जी झाडे खेचून घेतील ती झाडे पण शक्तीनाडीचे काम करतात.

तसेच सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश शक्तीनाडीचे काम करत असतात.

वरती चमकणारी वीज आपल्या शरीरात खेळतच असते. विद्युत शक्ती ही प्रत्येक मानवाच्या शरीरात असते. मेंदूत electrical impulse असतात. Heart-beat electricity मुळेच चालू आहेत. ही विद्युत शक्ती म्हणजेच कामधेनू आहे. शक्तीनाडी स्वरूप आहे.
गोविद्यापिठम्‌ मध्ये गाईंची सुंदर जोपासना केली जाते. तिथे गोग्रासची सुविधा आहे.
तुम्ही जेव्हा एका गाईला पवित्र मानून पूज्य मानून तिचे पूजन करता, तिला जगवता, मानता तेव्हा तुमच्या शरीरातील विद्युतशक्ती समर्थ बनते, बलवान होते. म्हणजेच तुमच्या शरीरातील इच्छा शक्ती ही कामधेनू बलवान करते. गाईच्या चार पावलापैकी कामधेनू हे तिचे स्वरूप हे तिचे पहिले पाऊल.

गाईची ४ पावले म्हणजे

१. कामधेनू स्वरूप - पहिले पाऊल

२. गायत्री मंत्र - दुसरे पाऊल

३. विश्वात्मक शक्तीनाडी - तिसरे पाऊल

४. देहस्थ शक्तीनाडी - चौथे पाऊल

गायत्री मंत्रावर मी  ३ १/२ तास बोललो होतो. गायत्री मंत्र म्हणजे काय? आपल्या धृतीला प्रज्ञेला (बुद्धीला) प्रकाशित करण्यासाठी त्या सवितृला (दत्तगुरूंना) केलेले आवाहन आहे.

आम्हाला गायत्री मंत्र म्हणावासा वाटला तर सद्‍गुरु गायत्री मंत्र म्हणावा. कुणाला गायत्री मंत्र सकाळी म्हणायचा असेल तर १२ वेळा म्हणावा. गायत्री मंत्र केवळ ब्राम्हणांनी म्हणावा हा चुकीचा समज आहे.

हे गोपद्म म्हणजे ह्या कामधेनूची ४ पावले आहेत. गोपद्ममध्ये माझ्या लहानपणी जी पध्दत पाहिली ती म्हणजे २ पावले माझी आई कढायची व २ पावले वडील काढायचे.

गोपद्मावर साधी हळद-कुंकू वाहा. ही कामधेनू आमची इच्छाशक्ती वाढवणारी आहे.
मातेची जी इच्छा आहे, जी सर्व पुरुषार्थ देणारी आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते

कामधेनू सूक्त म्हणणे कठीण आहे. कामधेनू सूक्ताचं पठण करून हवन केल्यावर जे यागाचं पुण्य मिळतं तेच पुण्य ही चार गोपद्म घराच्या उंबरठ्यावर किंवा देव्हार्‍यासमोर काढली व त्यावर हळद कुंकू वाहिलं की मिळतं.

कामधेनू - सूक्ष्म रूपात

गायत्री मंत्र - ध्वनी रूपात
 
विश्वात्मक - विद्युत रूपात

देहस्थ शक्ती - देहस्थ विद्युत

जे आदिमातेने तयार केले ते माणसाला सहज पेलता यावे यासाठी ती algorithem तयार करते.

प्रत्येक गाईत हा कामधेनूचा जर अंश असेल तर प्रत्येक गाय पूज्य असलीच पाहिजे. पूर्वी श्रावणी सोमवारी गाईला एक ताट दिले जायचे.
दुष्काळग्रस्त भागात चारा मिळत नाही, त्यामुळे गुरे कसायाच्या हातात जातात. म्हणून आपण चारा लावतो आणि अशा गुरांना देतो.

पूर्वी दारासमोर रोज सारवून गोपद्म काढली जायची. आपण रोज देवासमोर उंबरठ्याबाहेर गोपद्म काढू शकतो.

जेव्हा मंगलयान गेले तेव्हा सगळे scientist प्रथम त्याची प्रतिकृती घेऊन तिरुपतीकडे गेले. परमेश्वराच्या चरणी जायची त्यांना लाज वाटली नाही.

आम्ही उदी लावताना, नमस्कार करताना पण लाजतो.

सणासुदीच्या दिवशी तरी गोपद्म काढा. ३ तासाच्या कामधेनू सुक्ताऐवढेच पुण्य गोपद्म काढल्याने मिळते.

ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच अशा घरात जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या घरी आत येतो तेव्हा त्याची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते.

म्हणून गोपद्म उंबरठ्यावर काढले जाते. ज्या घरासमोर गोपद्म असतील त्या घरातून बाहेर जाताना प्रत्येक व्यक्ती शुभ ताकद घेऊन जाणार आहे.

वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढा त्या दिवशी ” ॥ ॐ श्री सुरभ्यै नम: ॥ ” हा मंत्र म्हणा. सुरभी म्हणजे कामधेनू. हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणा. हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो ह्या मंत्राचा जप वसिष्ठांनी केल्यामुळे त्यांना अख्खीच्या अख्खी कामधेनू प्राप्त झाली.

ही गोपद्म अवश्य घरासमोर काढावीत हा कामधेनूचा मंत्र आपण दररोज देखील म्हणू शकतो.
जेव्हा जेव्हा पाडवा, भाऊबीजेला औक्षण कराल तेव्हा नक्की गोपद्म काढा.

॥ हरि ॐ ॥

No comments:

Post a Comment