Thursday, May 12, 2022

tulsipatra

।।हरि ॐ।।

*पिपीलिकापांथस्थ प.पू.आद्यपिपा दादा*

*आज - १९ एप्रिल;*

*प.पू.श्री आद्यपिपादादा यांच्या समाधिस्थानम् चा स्थापना दिवस आहे.*

त्या अनुषंगाने *प.पू.बापूंचा* एक सुंदर तुलसीपत्र अग्रलेख (१९८) संग्रही आहे .,त्याचे स्मरण करूयात.

 चलेऊ नाइ सिरू पैठेऊ बागा।
फल खाएसि तरू तोरैं लागा।
रहे तहॉं बहु भट रखवारे।
कछु मारेसि कछु जाइ पुकारे।।
*सुंदरकांड ओवी १०४*

 संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी अगदी नि:संदिग्धपणे हे दाखवून देतात की जानकीमातेने आशीर्वाद दिला म्हणून हनुमंताने आदराने ,कृतज्ञतेने ,
उपकृत्यभावाने व प्रेमनिर्भर होऊन परमात्मत्रयीस प्रणाम केला व त्यानंतर तिच्याकडून अ-शोकवनातील फळे खाण्याविषयीची आज्ञा मागितली.
तिच्याकडून ती आज्ञा मिळताच *परत एकदा कार्याला सुरूवात करताना हनुमंत नतमस्तक झाला.*

हा *दुसरा नमस्कार* आता कुठल्याही आशीर्वादाच्या वा वराच्या मागणीविषयी ,वर मिळाल्याच्या आनंदासाठी किंवा फळे खाण्याची परवानगी दिली ,म्हणूनही नाही.

हा *दुसरा प्रणाम* वरील कुठल्याही कारणासाठी नसून,
*फक्त प्रत्येक श्रध्दावानाचे कुठल्याही कार्यातील "पहिले पाऊल" कसे असायला हवे,ते "स्व-आचरणाने" आपल्या वानरसैनिकांना अर्थात "श्रध्दावानांना" दाखविण्यासाठी आहे.*

 *ह्या दुस-या नमस्काराचा एक सुंदर आविष्कार "मी" वारंवार अनेक वर्षे शिरडीतील द्वारकामाईत पाहिलेला आहे.*

*आद्यपिपा* जेव्हा जेव्हा शिरडीत येत ,तेव्हा तेव्हा अगदी कितीही दिवस राहिले ,तरी त्यांचे *मन* भरत नसे.
शिरडीतून बाहेर निघण्याअगोदर *ते* आपल्या दोन्ही मुलांना - *सुचितदादा* व *समीरदादा* आणि *स्वत:च्या पत्नीस* बरोबर घेऊन द्वारकामाईतील त्या सुंदर प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहत असत.
*काकांच्या हातात एक श्रीफळ असायचे व डोळ्यांत विरहाचे अश्रू!*
त्यानंतर तो नारळ सुचित वा समीरकडे दिला जायचा , द्वारकामाईबाहेरच्या कुठल्याही दगडावर आपटून फोडण्यासाठी व मग ही दोन्ही मुले नारळ फोडून लगबगीने परत येत.
त्या नारळातील पाण्याचे काही थेंब तेथील *पादुकांवर* सिंचन केले जावायचे व काही जल द्वारकामाईच्या सभामंडपातील *बाबांच्या बसावयाच्या शिळेवर* अर्पण केले जायचे.

 अर्धा नारळ फोटोसमोरच ठेवला जायचा व अर्धा नारळ नारळाच्या पाण्याने नव्हे तर *अश्रूंनी चिंब* होऊन *प्रसाद* बनून काकांबरोबर परतायचा.
काका ह्या नमस्कारास *परतण्याची आज्ञा घेणे* असे म्हणत असत आणि म्हणूनच शिरडीतील राहत्या जागेपासून सर्व सामानसुमान घेऊन हा आद्यपिपा आपल्या कुटुंबीयांसमवेत निरोप घ्यायला येत असे व मग तेथूनच मधे कुठेही न थांबता थेट एस.टी.बसकडेच कूच करायचे.

९६ च्या आपल्या पहिल्या रसयात्रेमध्ये साईस्तवनमंजिरी वाचून झाल्यानंतर आद्यपिपांनी नमस्कार केलेलाच होता., त्यांचे सर्व सामान समीरदादांनी तिथे आणलेलेच होते.
पण आता इथूनच बसमध्ये बसावयाचे म्हटल्यावर त्यांनी स्वत: जाऊन नारळ आणलाच व पतिपत्नींनी तशीच आज्ञा घेतली. त्यांचे दोन्ही पुत्र त्यांच्या मागे तसेच उभे होते.
समीरदादांनी तसाच नारळ फोडला.
*फक्त ह्यावेळेस एकच गोष्ट वेगळी होती आणि ती म्हणजे ;  विरहाचे अश्रू नव्हते.*

माझ्या लाडक्या श्रध्दावान मित्रांनो;
*श्रीहनुमंताचे अधिष्ठान असणा-या "पिपीलिकापांथस्थ" पदावर आरूढ होण्याचा आद्य मान (पहिला मान) मिळविलेला हा पिपीलिकापांथस्थ म्हणूनच कधीही उथळ बनलाच नाही,* 
*त्याचे पाय जमिनीवरून कधी सुटलेच नाहीत आणि म्हणून त्याच श्रीहनुमंताचा संदेश श्रध्दावानांना देऊ शकला.* 

श्रीराम!
अंबज्ञ!!
नाथसंविध्!!!

No comments:

Post a Comment