Wednesday, June 14, 2023

Jagannath utsav mumbai

# ७ अनिरुध्द बापु 
पुरीचे देव गायब, जगन्नाथ मुंबई मध्ये

२००३ सालची ही घटना आहे. जगन्नाथ पुरी चे पुजारी मंदिरात पुजा करत होते. पुजाअर्चना करताना पाण्यात देवाचे प्रतिबिंब पाहायची प्रथा आहे. जर प्रतिबिंब पाण्यात दिसले नाही की समजतात देव मंदिरात नाही. देवाचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही हे पाहून पुजारी घाबरले. त्यांनी लागलीच एक अनुष्ठान सुरू केले. त्यावेळी एकाला दृष्टांत झाला की देव जगन्नाथ मुंबईला आहेत. रातोरात विमान पकडून पंडे लोक मुंबईला आले. मुंबईला देव शोधत भटकत होते .

त्याचवेळी सदगुरू श्रीअनिरूद्धांनी श्री जगन्नाथ अष्टतीर्थ उत्सव सायन , मुंबई येथे आयोजित केला होता..

.. इथे पंडे मुंबईत भटकून कुठे जगन्नाथांना राहिले पाहू लागले , त्यांना समजलं की सायन ला देवाचा उत्सव चालु आहे , पंडे उत्सवस्थळी आले आणि जगन्नाथा समोर गडबडा लोळू लागले ...देवांसमोर लोळून लोळून विनंती करीत होते .." देवा सोबत चला, देवा सोबत चला".. 
त्यांनी हे कुणी आयोजित केलेय ह्याची चौकशी केली , आणि श्री अनिरूद्ध बापू आयोजक आहेत कळल्यावर पंडे बापूंना भेटायची विनंती करू लागले , बापूंना ते म्हणाले की आम्ही देवाला नेतोय , तुम्ही परवानगी द्या , बापूंनी तेव्हा सांगितलं , सुभद्रे सहित बलदाऊ आणि जगन्नाथ माझ्या संकल्पाने आलेत, माझा संकल्प पूर्ण झाला की हे तिघेही पुन्हा पुरीच्या देवळात येतील ...

पूरीला या १० दिवसात देवांचे प्रतिबिंब पाण्यात दिसत नव्हते. तीर्थी देव नव्हते... पुरीचे जगन्नाथ मुंबापुरी राहिले होते... 
म्हणूनच सांगावे वाटते ओस पडली स्वर्ग नागरी देव धावत आले इथे
अंबज्ञ
नाथसविध

No comments:

Post a Comment